रविवार, ३ मे, २०१५

किल्ला रसाळगड

किल्ला रसाळगड

     सह्याद्रीची रांग उत्तरदक्षिण पसरलेली आहे. मुख्य रांगेपासून सुटावलेल्या अनेक रांगा पाच पंचवीस मैल लांबवर पसरलेल्या आहेत. पोलादपूर सोडून खेडवरून चिपळूणकडे जाताना रसाळगड, सुमारगड, महिपतगड हे तीन दुर्ग आपले लक्ष वेधून घेतात. हे सर्व किल्ले जावळीच्या खोर्यातच येतात. प्रतापगड, मधुमकरंदगड, रसाळगड, सुमारगड आणि महिपतगड हा ट्रेकही खूप प्रसिद्ध आहे.
    गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
    रसाळगडाचा घेरा लहानच असल्याने संपूर्ण गडफेरीस एक ते दीड तास पुरतो. रसाळवाडीतून किल्ल्यावर शिरतानाच वाटेत दोन दरवाजे लागतात. पहिले प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोरच तटातील मारुतीचे दर्शन होते.
 वळसा मारून आपण किल्ल्याच्या दुसर्या दरवाजात पोहचतो. या दरवाजातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच तटावर एक भली मोठी तोफ दिसते. तोफा हे या किल्ल्यांचे मोठे वैशिष्टच आहे. किल्ल्यावर लहानमोठा मिळून सुमारे १६ तोफा आहेत

संपूर्ण किल्ल्याचा माथा म्हणजे एक पठारच होय. समोरच झोलाई देवीचे मंदिर आहे. मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. कोनाडात अनेक सापडलेल्या मूर्त्या ठेवल्या आहेत. मंदिराच्या समोर दीपमाळ आणि तुळशी वृंदावन आहे. समोरच एक तोफ सुद्धा ठेवलेली आहे. मंदिराच्या बाजूला पाण्याचा मोठा तलाव आहे. हे पाणी पिण्यासाठी योग्य आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला शिवाचे छोटेसे मंदिर आहे. पाण्याच्या टाक्याच्या वरच्या भागाला थोडासा उंचवटा आहे , यालाच बालेकिल्ला म्हणतात. यात वाडांचे मोठा प्रमाणावर अवशेष आहेत. बुरूजाव तोफा आढळतात. येथून समोरच एक दगडी बांधकाम असलेली खोली आढळते. हे धान्य कोठार असावे असे वाटते. बालेकिल्ल्याच्या जवळच आणखी एक पाण्याचा तलाव आहे. या दोन्ही तलावात बारामही पाणी असते. किल्ल्याच्या नैऋत्य भागात एक नंदी आहे. मात्र येथे शिवाची पिंड आढळत नाही. किल्ल्यावर पाण्याची टाकी मोठा प्रमाणावर आहेत. म्हणजे हा किल्ला पूर्वी मोठा प्रमाणावर नांदता असावा.

काही किल्ले असे असतात कि कोणत्याही मोसामांमधे  तिथे जवस वाटत. रसाळगड हा अशा किल्ल्यांपैकी एक. कोणत्याही मोसमात जा, इथला निसर्ग आपल्यला खाली हाती कधीच पाठवत नाही. खेडला पोहोचाल कि भरणानाक्यावरून एक रस्ता डावीकडे निमानिवाडी रसाळगड कडे वळतो. आता किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी नवीन रस्ता झाला आहे. पहिली तिथून एक पायवाट होति.
पावसाळ्यात वाटेच्या दुतर्फा हिरवगार जंगल मध्येचं वात ओलांडताना  रानडुक्कर दिसतो. झादाझुडपांमध्ये एकमेकाशी टिवल्याबावल्या करणारे मोर दिसतात. एखाद गाव हे वाड्यांपासून बनलेलं असपेठ वाडी म्हणून एक वाडी आहे.
ता अशी आपली समजूत आहे. पण इथे रसाळगड हे सात वाड्यांपासून बनलेल आहे. आता एसटी गडाच्या पायथ्याशी जाते पुढे सुरु होतो तो तांबड्या रंगाचा रस्ता एका  बाजूला दरी आणि दुसऱ्या बाजूला डोंगर असा हा रस्ता. मध्येच एखाद्या ओहोलच्या थंड पाण्याचा गारेगार स्पर्श पावलांना होतो. पठारावर भात लोंब्यांवर येऊ लागलेली असतात तर कुठे हलवि भातही तयार झालेली दिसतात. निमाणी गावातून एका तासात आपण एका आधुनिक पाण्याच्या टाकीजवळ येउन पोहोचतो. या खिंडीतच महीपत सुमारगडावरून येणारी वात येउन मिळते. इथून रसाळगड अगधीच थिटूकला दिसतो. गडाच्या पायथ्याशी पुढे किल्ल्याचा पहिला दरवाजा लागतो.दरवाज्याच्या बाजूने एक छोटीशी वाट गेली आहे. ती वाट आपल्याला सुरुंगाच्या पाण्याच्या टाक्या जवळ पोहोचवते. पहिला दरवाजा चढून पुढे जाताच समोर हनुमानच मंदिर लागत हनुमानाच दर्शन घेऊन जाताना किल्ल्याच्या एका पायरी वर काही  विरगळ शिल्प आढळून येत. थोड पुढे गेल्यावर दुसरा दरवाजा लागतो.
रसाळगड नावा प्रमाणे रसाळ आहे.गडाचा घेरा ५ ते ७ एकर पेक्षा जास्त नाही. पण एवढ्याशा किल्ल्यावर १६ तोफा आहेत. दुसरा दरवाजा ओलांडून झाल्या नंतर आपण गडावर पोहोचतो. सुरुवातीलाच एक मोठी तोफ आढळून येते. पुढे गेल्यावर झोलाई वाघजाई देवीच मंदिर आहे. ह्या मंदिराच्या कोनाड्यात अनेक देव – देवतांचे मुर्त्या आढळून येतात. मंदिराच्या शेजारी एक पाण्याचा तलाव आहे, हे पाणी पिण्या योग्य आहे. तसेच तलावाच्या बाजूला गणपतीच मंदिर आहे. मंदिरच्या बाजूला बालेकिल्ल्यचा अवशेष आहे. तसेच त्यला छोटे बुरुज आहेत. ह्या किल्ल्यावर दर तीन वर्षांनी झोलाई देवीची जत्रा असते.
किल्ल्याच्या थोड पुढे गेल्यवर शंकराची पिंड आहे तसेच  नंदि आहे. किल्ल्यावर पूर्वी धान्य साठवण्या साठी धान्य कोठार तयर करण्यात आली होती ती आजीही चांगल्या अवस्थेत आहे . किल्ल्याच्या भोवती पाच पांडवांनी बांधलेले  ७ पाण्याचे टाके ( खांबटाका ) आहेत. पण यातील एकच खांबटाका पाहतो यातून कारण पुढे रस्ता खूप अवघड आहे.
१६६० च्या मोहिमेत शिवाजीराजांनी रसाळगड जिंकला आणि  पुढे १७५५ मध्ये तुळाजी आंग्रे यांनी पुन्हा रसाळगड घेतला. नानासाहेब पेशव्यांनी तुळाजी आंग्रेकडून सर्व किल्ले घेतले रसाळगड तेवढा राहिला. पुढे तुळाजी आंग्रे शरण आल्यावर रसाळगड त्यांच्या ताब्यात आला आसवा.
अशाप्रकारे रसाळगड आपल्यला त्याच्या कुशीत घेऊन  मिरवत असतो. हा एक – दीड तासाचा प्रवास कधी संपतो ते देखील समजत नाही. हा ट्रेक इथेच संपत नाही. यापुढे आपण सुमारगड आणि महीपत गड देखील करता येतो.
 गडावर जाण्याच्या वाटा :
    १.खेड वरून वडगाव बिरमणी कडे जाणारी बस पकडायची आणि वाटेत असणार्या हुंबरी फाटावर उतरायचे. हुंबरी फाटापासून थेट बीड गावात जाणारी वाट पकडायची. साधारणतः बीड गावात पोहचण्यास एक तास लागतो. वाडीबीड गावातून गडावर जाण्यास मळलेली वाट आहे. या मार्गाने किल्ल्यावर पोहचण्यास दीड तास लागतो.
    २.खेड वरून निमनी गावात जाण्यासाठी बसेस सुटतात. निमनी गावात उतरून एका तासात रसाळवाडी मार्गेकिल्ला गाठता येतो. वाट अत्यंत सोपी आहे.
    ३.खेड वरून मौजे जैतापूर गावात जाणारी एस. टी. पकडावी. मौजे जैतापूरहून - रसाळवाडी मार्गेदोन तासात रसाळगड गाठावा. वाट अत्यंत सोपी आहे.
पोहोचण्याचा मार्ग : खेड पासून रसाळगड एसटी शेवटचा थांबा.
(सकाळी आकारा वाजता , दुपारी एक वाजता, संध्याकाळी पाच वाजता, पाचची एसटी गावात वस्ती करते आणि तीच सकाळी साडे सहाला निघते. )
    राहण्याची सोय : झोलाई देवीचे मंदिर (३० ते ४० माणसे राहू शकतात.)
    जेवणाची सोय : आपण स्वतः करावी किवा  पेठ वाडी येथे ग्रामस्थाकडून खाण्याची सोय होऊ शकते.
    पाण्याची सोय : बारामही उपलब्ध आहे./झोलाई देवी मंदिराच्या बाजूला असलेला  पाण्याचा टाका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा