क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा
महात्मा ज्योतिबा
फुले यांचे मूळ गाव - कटगुण (सातारा) व गोर्हे हे मूळ
आडनाव. ज्योतीबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते.
सावित्रीबाईंना शिक्षित करून शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. सावित्रीबाई देशाच्या
पहिल्या मुख्याध्यापिका आहेत. स्वतंत्रपणे मुलींसाठी शाळा काढणारे महात्मा फुले
पहिले भारतीय होत. १८८० - नारायण मेधाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड
असोसिएशन' या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य
केले.
सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना
केली पुरोहितांकडून होणार्या न्याय अत्याचारापासून गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता
करणे व त्यांना हक्काची जाणीव करुन देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. सार्वजनिक
सत्यधर्म हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण
ग्रंथ मानला जातो. दीनबंधू साप्ताहिक मुखपत्र म्हणून
चालविले जात असे. सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥ हे समाजाचे घोष वाक्य होते. सत्यशोधक समाजाने
गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी
केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरवात केली. मराठीत
मंगलाष्टकं रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण
पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्या त्यांच्या
कवितेच्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. –
“ विद्येविना मती गेली। मतिविना
नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।”
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।”
सत्यशोधक समाजा’चे संस्थापक, आपल्या पुरोगामी विचारांचे निर्भयपणे आचरण करणारे समाजसुधारक, एकंदरच सुधारणेसंबंधी क्रांतीकारक भूमिका घेणारे आधुनिक महाराष्ट्राचे विचारवंत म्हणजे महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले.
महात्मा फुल्यांचा वडिलांचा फुलं विक्रीचा
व्यवसाय त्यामुळे फुले म्हणून ते ओळखण्यात येऊ लागले. व तेच नाव पुढे रूढ झाले.
प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. १८४२ ला माध्यमिक
शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी
अतिशय तल्लख त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. वाचनाची
अतिशय आवड असल्यामुळे शिवाजी महाराजांचे चरित्र व थॉमस पेन या बंडखोर
विचारवंताच्या ‘राईटस् ऑफ मॅन’ या ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष
प्रभाव पडला. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील
जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा
त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे आपल्या पत्नी सावित्रीबाईंना त्यांनी साक्षर
केले. १८४८ साली पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी
सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली.
तसेच अस्पृश्य मुलांसाठी पुण्याच्या वेताळपेठेत १८५२ मध्ये त्यांनी शाळा स्थापन
केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण ज्योतिबा आपल्या
भूमिकेवर ठाम असत. समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी व व्यापक
करण्यासाठी १८७३ साली त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. ‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला
नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे
रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी
त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे
त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या ‘शेतकर्याचा आसूड’
या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकर्यांची विदारक दर्दशा आणि
दारिद्रयाची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा
क्रांतीकारक म्हणून ही ज्योतिबांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’
हा विचार मांडणारे ज्योतीराव एक तत्वचितक व्यक्तीमत्त्व म्हणूनही
आपल्यासमोर येतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा